अध्यात्म, संतसाहित्य, धार्मिक साहित्य. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध अशा सर्व धर्मांचे ग्रंथ
श्रद्धेचे विज्ञान
श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळी असते का? श्रद्धेचा आपल्या जीवनात काही उपयोग असतो का? संस्कृतीच्या विकासात काही श्रद्धा उपयोगी ठरल्या आहेत का? नेहमीच्या जगण्यात.. श्रद्धा उपयोगी किंवा निरुपयोगी असतात का? श्रद्धा उपद्रवी किंवा निरूपद्रवी असतात का? श्रद्धांचा संबंध विवेकाशी असतो का? विवेकाने श्रद्धा बदलता येतात का? श्रद्धांच्या मागे काय विज्ञान आहे? हे सगळे श्रद्धेचे विज्ञान वाचल्यावरच कळेल! |
ई साहित्य च्या या साइटवर हजारो पुस्तकं आहेत. सर्वच चांगली आहेत पण आपण सर्वच वाचू शकणार नाही हे खरेच. पण इथली तीन पुस्तकं अशी आहेत जी तुम्हाला मराठीत इतर कुठेही मिळणार नाहीत. श्री. अशोक कोठारे अनुवादित १६००० पानी महाभारत. श्री विजय पांढरे यांनी नव्या मराठीत आणलेली १०००० ओव्यांची ज्ञानेश्वरी आणि श्री साहेबराव जवंजाळ यांनी लिहीलेले श्रीमद्भगवद्गीतेवरील ३००० पानी भाष्य. भगवद्गीता: परिवर्तनाच्या व्यवस्थापनाचे तत्त्वज्ञान.
गीता सर्वांनाच वंदनीय आहे. काही लोक अजिबात न वाचता तिला वंदनीय म्हणतात. काही वाचायचा प्रयत्न करतात व सोडून देतात. काही तिचा अर्थ न समजता ती वाचतात, तिचे पठण करतात. काही तिचा अध्यात्मिक अर्थ समजून घेऊन वाचतात. श्रीमद्शंकराचार्यांनी त्यातला ज्ञानयोग जाणला व जाणकारांत पसरवला. संत ज्ञानेश्वरांनी त्यातला भक्तीयोग अंगी बाणवला आणि सामान्यजनांत प्रसार केला. लोकमान्य टिळकांनी त्यातल्या कर्मयोगाचे तत्कालीन महत्त्व जाणले आणि गीतारहस्याद्वारे तो लोकांप्रती पोहोचवला. स्वामी विवेकानंदांनी तिचे वैश्विक महत्त्व जाणून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली. हे सर्व गेल्या शतकांतील त्या त्या काळांशी सुसंगत होते. श्री. साहेबराव जवंजाळ यांनी आजच्या तरुणांना ही गीता किती मार्गदर्शक आहे याचे सार्थ दर्शन त्यांच्या पुस्तकातून घडवले आहे. एका अर्थी त्यांनी आपल्याआधीच्या या चार महानुभावांचे कार्य पुढे नेले आहे. भगवद्गीता सार्वकालीन आहे, वैश्विक आहे आणि चिरतरूण आहे. ते बदलाच्या व्यवस्थापनाचे तत्त्वज्ञान आहे. Today’s youth has to face the challenge of CHANGE and Bhagavadgeeta is the right Philosophy for MANAGING the CHANGE in right direction. या संदर्भात साहेबरावांनी जगभरातील अनेक महान तत्त्ववेत्त्यांचे व विचारवंताचे विचार संदर्भासाठी नेमके मांडले आहेत. भगवद्गीतेचे अनेक पैलू व त्यांची आजच्या व येणार्या काळाशी सुसंगती त्यांनी मांडली आहे. हे पुस्तक अध्यात्माहूण अधिक व्यवस्थापनशाश्त्राचे आहे. हे पुस्तक प्रत्येक तरुणाने वाचावे असा आमचा आग्रह राहील. नुसते वाचू नये तर ते आत्मसात होईतो वाचावे. अभ्यासावे. बस. तुमचे, आमचे व समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्याची कुवत असलेली ही तीन पुस्तके आहेत असे समजा. |
महाभारताच्या शांतीपर्व१ या ३६ व्या खंडात वाचा.
ब्रह्मास्त्र ज्ञानासाठी भार्गवमुनींकडे गेलेल्या कर्णाला मुनींनी शाप दिला का? कर्णाची मांडी पोखरणारा भुंगा खरा कोण होता? नारदमुनी कर्णाची संपूर्ण गोष्ट युधिष्ठिराला का सांगतात व शेवटी काय म्हणतात? युधिष्ठीर समस्त स्त्रीवर्गाला काय शाप देतो? का? युद्धानंतर युधिष्ठीर अर्जुनासमोर शोक का करतो? त्याला अर्जुन काय उत्तर देतो? भिम युधिष्ठिराला बेजबाबदार मुर्ख अशी दूषणे का देतो? गृहस्थाश्रम हा सर्वश्रेष्ठ आहे असे नकुल का म्हणतो? सहदेवाचे विचार काय असतात? पाच भाऊ व द्रौपदी यांच्या वादांतून “राजधर्म” काय असतो ते या भागात विषद केले आहे. या सर्वाचा समारोप श्रीकृष्ण आपल्या विचारांनी करतो. त्यासाठी तो श्रींजयाचा मुलगा सोन्याचा कसा झाला? सोन्याची विष्ठा टाकणार्या मुलाची गोष्ट, प्रायश्चित्त म्हणजे काय? उत्तम खाद्य कोणते? व्यसनास्क्त ब्राह्मणाला कसे वागवावे? हस्तिनापुरात पांडवांचे स्वागत कसे झाले? कोणता वाडा कोणाला मिळतो? भिष्मांचा मृत्यू कसा होतो? मृत्यूसमयी भिष्म युधिष्टीराला राजधर्म कसा सांगतात? माणुसकी आणि चांगुलपणा यात काय भेद आहे? महाभारत ही केवळ मनोरंजक कथा नाही. तो एक वैचारिक संघर्षाचा इतिहास आहे. काय बरोबर काय चूक यांच्या मुळाशी जाऊन घेतलेला शोध आहे. पुर्वीच्या काळी शिक्षणाचा पाया रामायण व महाभारत यांतील मूल्यांचा अभ्यास होता. कारण यातून मुलांचे मुल्यशिक्षण होते. महाभारत मुलांनी व तरुणांनी वाचावे. मुळापासून वाचावे. त्यातील विचारांचा, वाद आणि संवादांचा अभ्यास करावा, केवळ वरवरची कथा वाचून मौज करू नये तर त्यामागचे गुह्य समजून घ्यावे. मराठीमध्ये इतके मुळापासूनचे दशसहस्त्रपानी महाभारत फ़क्त श्री अशोक कोठारे यांनी अनुवादित व केवळ ई साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केले आहे. |
महाभारत ही केवळ मनोरंजक कथा नाही. तो एक वैचारिक संघर्षाचा इतिहास आहे. काय बरोबर काय चूक यांच्या मुळाशी जाऊन घेतलेला शोध आहे. पुर्वीच्या काळी शिक्षणाचा पाया रामायण व महाभारत यांतील मूल्यांचा अभ्यास होता. कारण यातून मुलांचे मुल्यशिक्षण होते.
महाभारत मुलांनी व तरुणांनी वाचावे. मुळापासून वाचावे. त्यातील विचारांचा, वाद आणि संवादांचा अभ्यास करावा, केवळ वरवरची कथा वाचून मौज करू नये तर त्यामागचे गुह्य समजून घ्यावे. मराठीमध्ये इतके मुळापासूनचे दशसहस्त्रपानी महाभारत फ़क्त श्री अशोक कोठारे यांनी अनुवादित व केवळ ई साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केले आहे. ----------------- महाभारताच्या ३५ व्या खंडात वाचा दुर्योधनाच्या मृत्युसमयी अश्वत्थामा, कृपाचाय व कृतवर्मन यांची मनःस्थिती, त्यातून अश्वत्थामा पांडवांच्या सर्व पुत्रांना झोपेतच (सुप्तीत) मारण्याची योजना मांडतो. त्यावर इतर दोघांचे विचार व चर्चा. अखेर अश्वत्थामा एकटाच कसा निघतो व परत का येतो? त्याच्याकडे ब्रह्मास्त्र असूनही ते वापरता का येत नाही? त्याने श्रीकृष्णाकडे सुदर्शन का मागितले , श्रीकृष्णाने ते दिल्यावर काय झाले? अखेर पांडवांच्या सर्व पुत्रांचा मृत्यू झाला का? त्यानंतरही पांडवांच्या सुनेला गर्भ राहून परिक्षिताचा जन्म कसा झाला? काय होता तो गर्भ? भीमाने द्रौपदीच्या सांगण्यावरून अश्वत्थाम्याला काय शिक्षा केली? ती मृत्यूहूनही भयंकर का होती? युद्धानंतर, विदुर आणि धृतराष्ट्रामधे काय चर्चा झाली? विदुराने धृतराष्ट्राला कसे समजावले? धृतराष्ट्र अखेर युद्धभुमीवर का व कसा गेला? त्याला भेटायला युधिष्ठिर आणि श्रीकृष्ण का आले? ते कसे भेटले? त्यांचे काय बोलणे झाले? या पर्वाची अखेर "स्त्रीविलापपर्वा" ने होते. पांडव आणि गांधारी यांची भेट. द्रौपदी आणि कुंती यांचा संवाद. दोघींनाही जिंकल्याचा आनंद नसतो तर आपला वंश संपल्याचे दुख त्याहून मोठे असते. महाभारतातून खुप काही शिकायचे असते. ती केवळ कथा नाही. |
महाभारताच्या ३४ व्या खंडात वाचा - दुर्योधनाच्या मृत्यूसमयी त्याने श्रीकृष्णाला काय दूषणे दिली व त्यावर श्रीकृष्णाचे प्रत्युत्तर काय होते?
पण पांडवांना शरमिंदे का व्हावे लागले? कृष्णाने गांधारीची भेट का घेतली? व त्याआधी त्याला कसली भिती वाटत होती? भेटीत काय घडले? मृत्यूपुर्वी अश्वत्थामा आणि इतर दोघे दुर्योधनाला कसे भेटतात? स्वतःच्या मृत्यूबद्दल त्यांना झालेले दुःख पाहून त्या अवस्थेतही दुर्योधन त्यांचे सांत्वन कसे करतो? महाभारत ही कथा नाही. तो एक वैचारिक संघर्षाचा इतिहास आहे. काय बरोबर काय चूक यांच्या मुळाशी जाऊन घेतलेला शोध आहे. पुर्वीच्या काळी शिक्षणाचा पाया रामायण व महाभारत यांतील मूल्यांचा अभ्यास होता. कारण यातून मुलांचे मुल्यशिक्षण होते. महाभारत मुलांनी व तरुणांनी वाचावे. मुळापासून वाचावे. त्यातील विचारांचा, वाद आणि संवादांचा अभ्यास करावा, केवळ वरवरची कथा वाचून मौज करू नये तर त्यामागचे गुह्य समजून घ्यावे. मराठीमध्ये इतके मुळापासूनचे दशसहस्त्रपानी महाभारत फ़क्त श्री अशोक कोठारे यांनी अनुवादित व केवळ ई साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केले आहे. |
ज्ञानेश्वरीहून सुंदर या जगात मानवनिर्मित काहीही नाही.
ज्यांनी आजवर ज्ञानेश्वरी वाचली, ऐकली व एक तरी ओवी अनुभवली नसेल ते अभागी
श्री ज्ञानेश्वरी ही बाराव्या शतकात संत श्री ज्ञानेश्वरांनी सामान्य जनांना गीता कळावी म्हणून रचली. त्यातील रसाळ सुंदर ओव्या या त्याकाळच्या प्रचलित मराठी भाषेत आहेत. अनेकदा त्यांचा संपूर्ण अर्थ आताच्या सामान्य जनांना आकळत नाही. म्हणून श्री विजय पांढरे यांनी श्रीज्ञानेश्वरीतील ओव्या त्यातील सौंदर्यपूर्ण रचनेला धक्का न लावता आताच्या प्रचलित मराठी भाषेत आनल्या.
प्रस्तुत आहेत या ओव्या आणि मूळ ज्ञानेश्वरी.
आपण आनंद घ्या.
प्रस्तुत आहेत या ओव्या आणि मूळ ज्ञानेश्वरी.
आपण आनंद घ्या.
महाभारत : जवळपास सर्वच लोक महाभारत म्हणजे गंमत म्हणून वाचायच्या कथा गोष्टी असे समजतात. काही थोडे लोक त्यातून राजकारण, नीतीशास्त्र, मनुष्यस्वभाव यांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त अशा हितोपदेश किंवा इसापनिती सारख्या गोष्टी म्हणून ते वाचतात. पण खरं सांगायचं तर मूळ महाभारत याहून अगदी वेगळं आहे. त्याचा खरा गाभा आहे तो या गोष्टींच्या दरम्यान पेरलेल्या चर्चा. दोन वेगवेगळ्या विचारांचे द्वंद्व आणि मंथन. असे शेकडो चर्चा संवाद या पुस्तकात आहेत. सहसा लेखक या चर्चा टाळून बाकी पुस्तक लिहीतात. पण या चर्चा हाच खरा या महाग्रंथाचा आत्मा आहे. आणि असा हा महाग्रंथ आता प्रथमच मराठीत येत आहे.
हा ग्रंथ वाचणं हे येरागबाळ्याचे काम नोहे. पण एकाद्या येरागबाळ्याने हे वाचलेच तो तो येरागबाळा रहाणार नाही याची ग्यारंटी.
हा ग्रंथ वाचणं हे येरागबाळ्याचे काम नोहे. पण एकाद्या येरागबाळ्याने हे वाचलेच तो तो येरागबाळा रहाणार नाही याची ग्यारंटी.
महाभारत : जवळपास सर्वच लोक महाभारत म्हणजे गंमत म्हणून वाचायच्या कथा गोष्टी असे समजतात. काही थोडे लोक त्यातून राजकारण, नीतीशास्त्र, मनुष्यस्वभाव यांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त अशा हितोपदेश किंवा इसापनिती सारख्या गोष्टी म्हणून ते वाचतात. पण खरं सांगायचं तर मूळ महाभारत याहून अगदी वेगळं आहे. त्याचा खरा गाभा आहे तो या गोष्टींच्या दरम्यान पेरलेल्या चर्चा. दोन वेगवेगळ्या विचारांचे द्वंद्व आणि मंथन. असे शेकडो चर्चा संवाद या पुस्तकात आहेत. सहसा लेखक या चर्चा टाळून बाकी पुस्तक लिहीतात. पण या चर्चा हाच खरा या महाग्रंथाचा आत्मा आहे. आणि असा हा महाग्रंथ आता प्रथमच मराठीत येत आहे.
हा ग्रंथ वाचणं हे येरागबाळ्याचे काम नोहे. पण एकाद्या येरागबाळ्याने हे वाचलेच तो तो येरागबाळा रहाणार नाही याची ग्यारंटी.
हा ग्रंथ वाचणं हे येरागबाळ्याचे काम नोहे. पण एकाद्या येरागबाळ्याने हे वाचलेच तो तो येरागबाळा रहाणार नाही याची ग्यारंटी.